सिंहावलोकन....



सिंहावलोकन....

प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण ऑटो पायलट मोडवर जगत असतो नाही का? म्हणजेच आसपास काय सुरू आहे, आपण काय करत आहोत याचे भानदेखील आपल्याला नसते. अशावेळी आपण थांबून सिंहावलोकन केले की आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच देऊन जातो. आपण काय चुकत आहोत काय बरोबर करत आहोत हे आपल्याला कळून जाते. पण सिंहावलोकन करण्यासाठी एक अट असते ती म्हणजे तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे तरच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, बऱ्याच जणांना हे शक्य होतं नाही. कारण त्यासाठी तुमच्या मनांत दुसऱ्यांविषयी आदर आणि सदभावना असली पाहिजे तरच हे शक्य आहे. जापनीज संकल्पना इकिगाई सुद्धा हेच सांगते. 
प्रामाणिकपणा आणि सद्भावना यांचा अभाव असल्याने आपण चुकतो आणि पुन्हा पुन्हा त्याच चुका होत राहतात. काही वेळेला आपल्यालाच चुका टाळायच्या नसतात. आपण डोळ्यांवर पट्टी बांधून जगत राहतो मग त्या चूका होतंच राहतात आणि शेवटी निसर्ग उत्तर देतं...

निसर्ग उत्तर द्यायच्या आधी तुम्हांला तुमच्या जीवनाचा प्रामाणिक unfiltered आरसा दाखवणारा गरजेचा असतो आणि तिथं तुमची प्रश्ने संपतात....

SRN

Post a Comment

0 Comments